पाच वर्षे लोटली ध्रुव अंगी
पिता ठावुक नाही तया लागी
पुसे मातेशी भक्त राजयोगी
तात कोठे तो सांग मला वेगी...
म्हणे माता तानया काय झाले?
कुण्या पाप्याने तुज गांजयीले
मला राये मांडिये बैसविले
राजभाजेने पदी लोटविले
बुजविता माउली काय बोले?
आम्ही देवासी नाही पुजयीले
स्वामी जैसे मांडिये बैसविले
रमा रम्भे स्थापिता काय चाले
येरु बोले तो देव कसा आहे?
वसे कोठे तो सांग लवलाहे
माय बोले सर्वत्र देव आहे
चराचरही सर्व व्यापून विश्व राहे
तुझी बुध्दी काय बा वयसान
तुला कैसे देईल दर्शन
उभा जैसा तैसाची जाय वेगे
रडत पाठी लागली माय मागे
पुत्र गेला राजाशी दूर सांगे
राव झाला घाबरा मोह संगे
सर्व सौख्याचे मूळ बाळ माझे
ध्रुव गेला घेणार राज ओझे
लवलाही लागला ध्रुव पाठी
म्हणे बाळा ऐक बा एक गोष्टी
नको जावू देईन एक गाव
ध्रुव बोले देईल देवराव
पाच गाव दिधले आता
ध्रुव बोले मागेन जगन्नाथा
नको जावू देईन एक देश
ध्रुव बोले देईल जगदीश
अर्ध राज्य दिधले आन तुझी
ध्रुव बोले देवास लाज माझी
काही त्रुटी असतील कवितेत तर...... क्षमस्व
उत्तर द्याहटवामी सहावी वा सातवीत असताना..१९६१-६२च्या दरम्यान एक मराठी कविता पाठ्यपुस्तकात होती..
उत्तर द्याहटवासहज एकदा कैलासावर
सती पार्वती आणिक शंकर
मजेत सारीपाट खेळती
गंमत नंदी हसत बघे ती......अशी काहीशी ती होती.
ती कविता मला पूर्ण मिळेल का?कवीचं नाव माझ्या लक्षात नाही..पण सामान्यतः गोषवारा सांगायचा तर "जय जय गौरीशंकर"या श्री विद्याधर गोखले लिखित संगीत नाटकाची आधारभूत कथा त्या कविते द्वारे मांडली आहे.