मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इक उम्र कि कोशिश से भुला दी है तेरी याद,

इक उम्र कि कोशिश से भुला दी है तेरी याद ,   लेकिन अभी तक याद के साए नहीं जाते   

हम ने तेरे बग़ैर भी जी कर दिखा दिया,

हम ने तेरे बग़ैर भी जी कर दिखा दिया, अब ये सवाल क्या है के फिर दिल का क्या हुआ 

मावळतीला दार घराचे

मावळतीला दार घराचे शिणल्या जीवा कधी विसावा उभे राहुनी देहलीवरी नक्षत्रांना निरोप द्यावा झेप मृगाची क्षितिजावरतून ; मुळी न बघतो वळून मागे ; कशास असले साहस भलते … उगा जीवाला तगमग लागे रंगविलासी शुक्राचा तर हर्ष निळा अन दुःख गुलाबी ; उतरे शिंपत विरह जांभळा दे जीवाला धुंद शराबी अवचित ढळतो एकच तारा , एक ओढिने घेतो कोसळ ; बघून होते मुके मुके मन … निरोपांतले स्वागत व्याकुळ . तेजोग्रह ते कुठे , कुठे मी ; कुठे क्षितीज अन कुठे देहली ; फिरता तेथुन जड हे पाउल ; जाते उरली रात्र निराळी : मेंदी : इंदिरा संत  

दोन गुरू

दोन गुरू : नाना पाटेकर ------------------- वयाच्या तेराव्या वर्षी ,1963 ला नोकरीला लागलो . दुपारी शाळा संपली की घरी असेल - नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं . रात्री नऊ - साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं . घरी पोहोचायला साडेअकरा , कधीकधी बारा वाजायचे . पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला . नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं . जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं . कधीच भूत दिसलं नाही . पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती . कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा , परिस्थिती शिकवत होती . हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली . मरायचं नव्हतं . येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो , पर्याय नव्हता . रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई - वडिलांची आठवण यायची . ‘ त्यांनी काही खाल्लं असेल का ?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा . अपरात्री परतत असताना रस्ता निर्म