मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2009 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेघ नसता

मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले ! गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा ? तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले ! एवढे नाजुक आहे वय तुझे माझ्या फुला रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले ! लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे हे तुझे नक्षत्रवैभव का धरेवर राहीले ? पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले ! भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले ! : संदीप खरे 

कविता

स्वप्नी दूर दिसावी कविता.. जाग येता उशाशी असावी कविता ..! घोट भर कधी प्यावी कविता .. अर्घ्य म्हणून द्यावी कविता ..! गज-यात सखीच्या माळावी कविता .. कज-यात तीच्या भाळावी कविता ..! प्रेमात तीच्या सुचावी कविता.. प्रेमभंगात खरी कळावी कविता ..! चंदनासम उगाळता झिजावी कविता .. कस्तुरीसम न दिसता गंधावी कविता..! जाता जाता बीजासम पेरावी कविता.. येताना फुलासम बहरावी कविता..! अनंतीच्या प्रवासी निघावी कविता.. पोटी पुन्हा कुणाच्या अंकुरावी कविता..!!! श्वास बनुनी हृदयी वसावी कविता.. प्राणवायू बनुनी शरीरी रुजावी कविता..!! 'मी' पणा बनुनी माजावी कविता.. नम्र राहुनी जगी गाजावी कविता..!! पावसात अश्रूंच्या भिजावी कविता.. चांदण्यात सुखाच्या हसावी कविता..!! मरता मरता अचानक जगावी कविता.. अन कुणाचे आयुष्यच व्हावी कविता..!! आयुष्यगीत गाता समजावी कविता.. मरण सामोरे येता उमजावी कविता..!! : विनायक

राहिले रे अजुन

राहिले रे अजुन श्वास किती ? जीवना, ही तुझी मिजास किती? आजची रात्र खिन्न तारयांची आजचा चंद्रही उदास किती? मी कसे शब्द थोपवू मागे हिंडती सुर आसपास किती? दुख्ख माझे....विरंगुळा त्यांचा मी करावे खुळे कयास किती? ओळखिचे कुणी तरी गेले ओळखिचा इथे सुवास किती? हे कसे प्रेम? या कशा आशा? मी जपावे अजुन भास् किती? सोबतीला जरी तुझी छाया... मी करू पांगला प्रवास किती??? कवी - सुरेश भट post scrap cancel

मी गाताना गीत

मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला मी दुःखाच्या बांधुनी पदरी गाठी जपले तुज ओटी-पोटी कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना गलबला जीव होताना खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट नीजताना ते ऐकुनी का मन तडफड होई पाळणा म्हणे अंगाई आयुष्याला नको सावली काळी इश्वरा तूच सांभाळी झुलता झोका जावो आकाशाला धरतीचा टिळा भाळाला कवी - ना. धों. महानोर

बाळपणींचा काळ सुखाचा

बाळपणींचा काळ सुखाचा, आठवतो घडिघडी । तशि नये फिरुन कधिं घडी ॥ किति हौसेनें टाकिलि असती त्यांत मागुती उडी । परि दुबळी मानवकुडी । (चाल) मनिं नव्हति कशाची चिंता । आनंद अखंडित होता । आक्रोश कारणापुरता । जें ब्रम्ह काय तें मायबाप ही जोडी । खेळांत काय ती गोडी ॥ कवी - गोविन्द बल्लाळ देवल

प्रतिमा उरी धरोनी

प्रतिमा उरी धरोनी मी प्रीतिगीत गावे ते गीत प्रीतिचे रे हळूवार मी म्हणावे अस्फूट भावनांच्या स्वप्नात गुंग व्हावे पुष्पात गंध जैसा, गीतात भाव तैसा अद्वैत प्रीतिचे हे मम जीवनी असावे तू सप्तरंग धनुचे, स्वर सात बासरीचे संगीत जीवनाचे, अळवीत मी बसावे का रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे हे भावस्वप्न अपुरे साकार तू करावे कवी - दत्ता केसकर

पूर्तता माझ्या व्यथेची

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी, जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी. वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी. संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा कापलेले पंख माझे .... लोचने आता मिटावी. सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी. दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी .... आसवे साऱ्या फुलांची रोज खाली ओघळावी. कोण मी आहे ? मला ठाऊक नाही नाव माझे ! शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी. हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी ! काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी ? राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी ! कवी - सुरेश भट

नच साहवतो...

नच साहवतो हा भार गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार ओठ जरी हे माझे होते सूर उरी हे तुझेच होते तुझ्यावाचुनी जीवन माझे करूण आर्त उद्‌गार स्वप्नावाचुन आता डोळे चंद्रावाचुन अंबर काळे वाट तृषेची कठीण, नसता जवळ मेघमल्हार सरले दिन ते मंतरलेले पुन्हा परीची शिळा जाहले तुझ्यामुळे मी वीज जाहले, तुझ्यामुळे अंधार : वसंत निनावे 

दिवस तुझे हे फुलायचे

दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे  स्वप्नात गुंगत जाणे  वाटेत भेटते गाणे  गाण्यात हृदय झुरायचे  मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली  श्वासात चांदणे भरायचे  थरारे कोवळी तार  सोसेना सुरांचा भार  फुलांनी जखमी करायचे  माझ्या या घरच्यापाशी  थांब तू गडे जराशी पापण्या मिटून भुलायचे :  मंगेश पाडगावकर

तू दूर दूर तेथे

तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र येथे विरहात रात्र मोठी, प्रेमी जनांस वाटे शब्दात सांगु कैसे, ते दुःख अंतरीचे ओलावले दवांत, हे काठ पापण्यांचे भरला स्वरात कंप, कंपात भाव दाटे मी भाबडी मनाची, आहेच स्वप्नवेडी विरुनी तुझ्यात जावे, ही एक आस वेडी राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते भाळावरी असे हे, सौभाग्य लाल कुंकू विक्राळ काळ येता, दोघे तयास जिंकू फुलता मनात आशा, ओठांत गीत येते : मधुकर जोशी 

आधार

चिंब चिंब  भिजतो आहे  भिजता भिजता  मातीमद्ये  पुन्हा एकदा रुजतो आहे  हिरवे कोवळे कोंब माती  माझ्याभोवती बांधते आहे  विरते पाश सरते नाते  पुन्हा पुन्हा सांधते आहे...  अहो माझे तारणहार,  जाम्भळे मेघ धुवाधार  तेवढा पाउस माघार घ्या  आकाशातील प्रवासाला  आता तरी आधार द्या  आधार म्हणजे  निराधार... : आधार  : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

देण

मातीपण मिटता मिटत नाही आकाशपण हटता हटत नाही आकाश मातीच्या या संघर्रषयात माझ जखमांच देण काही सुटत नाही... : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

वेड

जे वेड मजला लागले, तुजलाहि ते लागेल का ? माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का ? मी पाहतो स्वप्नी तुला, मी पाहतो जागेपणी जे मी मुकेपणि बोलतो शब्दात ते रंगेल का ? हा खेळ घटकेचा तुझा, घायाळ मी पण जाहलो जे जागले माझ्या मनी, चित्ती तुझ्या जागेल का ? माझे मनोगत मी तुला केले निवेदन आज, गे सर्वस्व मी तुज वाहिले, तुजला कधी उमगेल का ? शांता शेळके

नक्षत्रांचे देणे***

गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे; माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त; दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला; होते कळ्यांचे निर्माल्य, आणि पानांचा पाचोळा : आरती प्रभू 

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ? कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कोणासाठी रक्त ओकून जगतात येथे कुणी मनात कुजून तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे दीप सारे जाती येथे विरुन विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे : आरती प्रभू 

अलवार तुझी चाहूल

अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर मनास का उमगेना तू समीप की रे दूर घन वादळवाऱ्यातून मी जपले सारे सूर कोंदणात आनंदाच्या लपविले असे काहूर अलवार तुझी चाहूल का धडधडते हे ऊर मनास का उमगेना तू समीप की रे दूर गीत - अजेय झणकर

हे बंध रेशमाचे

पथ जात धर्म किंवा नातेहि ज्या न ठावे ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ! विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाला पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ! क्षण एक पेटणारे हे युद्धवेड आहे देहाहुनी निराळी रक्तास ओढ आहे तीर्थाहुनी निराळे पावित्र्य संगमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ! हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे ! : शांता शेळके 

स्वप्नातल्या कळ्यांनो

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा : म पा भावे 

स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी निर्जीव उसासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे कुजबुजही नव्हती वेलींची हितगुजही नव्हते पर्णांचे ऐशा थकलेल्या उद्यानी विरहार्त मनाचे स्मित सरले गालावर आसू ओघळले होता हृदयाची दो शकले जखमेतुन क्रंदन पाझरले घाली फुंकर हलकेच कुणी पडसाद कसा आला न कळे अवसेत कधी का तम उजळे संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले किमया असली का केलि कुणी : यशवंत देव 

सर्व सर्व विसरु दे

सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा येथ जीव जडविणे हाच होतसे गुन्हा हे धुके, अशी हवा, ही उदासता भरे सूर सूर मिटुनिया लोपलीत पाखरे हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा रात्र रात्र जागुनी वाट पाहिली कुणी मंद होऊनी विरे अन्‌ पहाटचांदणी, स्वप्न संपुनी असे ये कठोर वंचना काय मोर थांबतो मेघ दाटता शिरी ? भान राधिके नुरे ऐकताच बासरी बंधनात जन्मतो मुक्तिचा खरेपणा हाक धुंद ही तुझी अंग अंग वेढिते होऊनी प्रवाह या बंधनात ओढिते मी मला अजाणता गुंतले अशी पुन्हा हास हास लाडक्या श्रावणातल्या उन्हा धुंद धुंद गंध ये दाटुनी फुलाविना : मंगेश पाडगांवकर 

शुक्रतारा

शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ? तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा तू असा जवळी रहा लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी रहा :  मंगेश पाडगांवकर 

शब्दावाचुन कळले सारे

शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन्‌ ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ? होय म्हणालिस नकोनकोतुन तूच व्यक्त झालीस स्वरातुन नसता कारण व्याकुळ होऊन उगिच हृदय धडधडले आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले : मंगेश पाडगांवकर 

शब्द शब्द जपून ठेव

शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी काय बोलले नकळे तू समजुन घे सगळे लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी दुःख नको तुटताना अश्रु नको वळताना मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी साक्ष लाख ताऱ्यांची स्तब्ध अचल वाऱ्याची ज्योत बनुन जळले रे मी तुझ्या पथावरी : मंगेश पाडगांवकर

भरारी

स्पंदने या माणसांची येवू दे शब्दात माझ्या चांदने संवेदनाचे वाहू देत रक्तात माझ्या घेतली नाही भरारी मी जरी तेव्हा दिशांनो, एक मी आभाळ आहे ठेवले पंखात माझ्या...

मी

जीवनातल्या तुझ्या एक मूर्त भास् मी वाटतो तुला खरा तो तुझा कयास मी राहिलो कसे गडे, जीवनात गुंतुनी? बोलणे तुझे दिशा, अन् मुका प्रवास मी post scrap cancel

तू पण ना !

भलते सलते विचारतोस, तू पण ना ! वर उत्तरही मागतोस, तू पण ना! (मग डोळ्यात काय वाचतोस? तू पण ना!) ...बस पुरे कर ती नजरेची सैर आता, तू पण ना! किती किती रे न्याह्याळतोस, तू पण ना! (काय काय रे न्याह्याळतोस, तू पण ना!) मनी तुझेच रूप, ओठी तुझेच नाव, सदा सोबतीस रहातोस, तू पण ना! (अन् स्वप्नातही जागतोस? तू पण ना!) तू आठवत असशील मला सारखा उचकी होवुन भेटतोस, तू पण ना! (भेटीची ओढ़ लावतोस, तू पण न!) पहिला पाउस... बदलून गेला ह्रुतु मोर होवुन नाचतोस, तू पण ना! (रंग हिरवा अंगी बाणतोस, तू पण ना!) तुझ्या रंगात रंगल्याच्या खुणा माझ्या देहभर आणिक मेंहदी लाव बोलतोस, तू पण ना ! (रंगाला गंध आणतोस, तू पण ना!) : संदीप मसहूर 

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा? स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा? मन थेम्बान्चे आकाश, लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा, मन कालोखाची गुंफा, मन तेजाचे राउळ, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाउल, दुबल्या गळक्या झोळीत हां सूर्य कसा झेलावा? चेहरा- मोहरा याचा, कधी कोणी पाहिला नाही धनि अस्तित्वाचा तरीही, याच्याहुन दूसरा नाही, या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा? मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा? स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा? : सुधीर मोघे 

आभाळाचे मन

असे असावे वाटते तसे नसावे वाटते अशा तशा वाटण्याने मन सारखे कोंडते अशा वाटण्याने झाले जग मजला पारखे अशा वाटण्याने झाले दुख माझे मुके मुके उशिरा हि ठेच किति उशिरा हे ज्ञान आता आजपासुनिया माझे आभाळाचे मन

संस्कार

जगण्याच्या हरवलेल्या निखळपणावर पैसा, प्रसिद्दि, प्रतिष्ठा हे जगण्याचे निकष ठरतात....आणि माणूस इतरांच्या नजरेतून जगायला लागतो.....स्वतःकड़े बघायला लागतो...यालाही संस्कार म्हणतात.... जे त्याला स्वतःच्या आत कधीही डोकावू देत नाहीत...

मेहरबान हो के बुला लो मुझे चाहो जिस वक्त

मेहरबान हो के बुला लो मुझे चाहो जिस वक्त मैं गया वक्त नहीं हूँ कि फिर आ भी न सकूँ

खुदा के वास्ते उसको न टोको यही एक शहर मैं क़ातिल रहा है

खुदा के वास्ते उसको न टोको यही एक शहर मैं क़ातिल रहा है कुछ तो होते हैं मोहब्बत मैं जुनून के आसार और कुछ लोग भी दीवाना बना देते हैं

हर क़दम पर नित नये सांचे में ढल जाते हैं लोग

हर क़दम पर नित नये सांचे में ढल जाते हैं लोग देखते ही देखते कितने बदल जाते हैं लोग किस लिए कीजिए किसी गुम-गश्ता जन्नत की तलाश जब कि मिट्टी के खिलौनों से बहल जाते हैं लोग कितने सादा-दिल हैं अब भी सुन के आवाज़-ए-जरस पेश-ओ-पास से बे-खबर घर से निकल जाते हैं लोग शमा की मानिंद अहल-ए-अंजुमन से बे-न्याज़ अक्सर अपनी आग मैं चुप चाप जल जाते हैं लोग शाएर उनकी दोस्ती का अब भी दम भरते हैं आप ठोकरें खा कर तो सुनते हैं संभल जाते हैं लोग :  हिमायत अली शाएर

श्रावण आला

हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला : कुसुमाग्रज 

नाते

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही  सगळ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वहात जाई ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला स्वरमेघ मंजुळांचा बरसे दिशात दाही गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा? मंझिलकी जयांचि तारांगणात राही : छंदोमयी  : कुसुमाग्रज 

दोहे

चाह मिटी, चिंता मिटी मनवा बेपरवाह । जिसको कुछ नहीं चाहिए वह शहनशाह॥ माटी कहे कुम्हार से, तु क्या रौंदे मोय । एक दिन ऐसा आएगा, मैं रौंदूगी तोय ॥ माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर । कर का मन का डार दे, मन का मनका फेर ॥ तिनका कबहुँ ना निंदये, जो पाँव तले होय । कबहुँ उड़ आँखो पड़े, पीर घानेरी होय ॥ गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागूं पाँय । बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो मिलाय ॥ सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद । कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद ॥ साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय । मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥ धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय । माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय ॥ कबीरा ते नर अँध है, गुरु को कहते और । हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रूठे नहीं ठौर ॥ माया मरी न मन मरा, मर-मर गए शरीर । आशा तृष्णा न मरी, कह गए दास कबीर ॥ रात गंवाई सोय के, दिवस गंवाया खाय । हीरा जन्म अमोल था, कोड़ी बदले जाय ॥ दुःख में सुमिरन सब करे सुख में करै न कोय। जो सुख में सुमिरन करे दुःख काहे को होय ॥ बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर। पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥ साधु ऐसा चाहिए ज

तो पाउस वेगळा होता...

जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता । आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता ।। ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते । ती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता ।। वेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते । डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता ।। पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही । ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता ।। : संगीता  जोशी 

देह मंदिर चित्त मंदिर

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना कवी - वसंत बापट

अंदाज आरशाचा

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा? की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा! काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा भेटून वादळाला, इतुके विचार आता शाबूत एवढाही, का, कोपरा असावा दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू लाचार ती असावी, तो, उंबरा असावा माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही' दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा कवी;  इलाही जमादार

पत्र लिही पण...

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण ! पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते कवयित्री - इंदिरा संत

तहान

सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण व्हावे एव्हढे लहान सारी मने कळों यावी असा लागावा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी फक्त मोठी असो छाती सारे दुःख मापायला गळो लाज गळो खंत काही नको झाकायला राहो बनून आभाळ माझा शेवटला श्वास मना मनात उरो फक्त प्रेमाचा सुवास कवी - म. म. देशपांडे

समिधाच सख्या या

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता, खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता || खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली पथ शोधित आली रानातून अकेली, नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट तीरावर तुरळक परि अंकुरती वेली || नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली, होईल सावली कुणा, कुणास कहाली, तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास, "या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !" समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा, कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा? जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा, तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा || कवी - कुसुमाग्रज

दुःख घराला आले

अंधार असा घनभारी चंद्रातुन चंद्र बुडाले स्मरणाचा उत्सव जागून जणु दुःख घराला आले दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन क्षितिज जसे धरणीला श्वासानी धरते उचलुन विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती जणु ह्रिदयामागुन माझ्या झाडांची पाने गळती नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे कवी - ग्रेस

देतां घेतां...

पुस्तकांतली खूण कराया  दिले एकदा पीस पांढरे;  पिसाहुनि सुकुमार कांहिसे  देतां घेतां त्यांत थरारे.   मेजावरचे वजन छानसे  म्हणुन दिला नाजूक शिंपला;  देतां घेतां उमटे कांही  मिना तयाचा त्यावर जडला.   असेच कांही द्यावे घ्यावे  दिला एकदा ताजा मरवा;  देतां घेतां त्यातं मिसळला  गंध मनांतिल त्याहुन हिरवा.  कवयित्री - इंदिरा संत

ती फुलराणी !

हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे; त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत; प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी; याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ? पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत; तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला- "छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ? कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ? तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?" लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी ! आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी; त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल ! जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला; निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान. अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ? लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ? या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन, मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही. त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं , सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं… तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ? त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं… तुमचं लग्न ठरवून झालं ? कोवळेपण हरवून झालं ? देणार काय ? घेणार काय ? हुंडा किती ,बिंडा किती ? याचा मान , त्याचा पान सगळा मामला रोख होता , व्यवहार भलताच चोख होता.. हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं… ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या.. मी तिला विचारलं , तिनं लाजून होय म्हटलं , सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……. त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला, इराण्याच्या हॉटेलात, चहासोबत मस्कापाव मागवला तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती, देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं? मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटल, सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……. मग एक दिवस, चंद्र, सूर्य, तारे, वारे, सगळं मनात साठवलं, आणि थरथरणार्‍या हातांनी , तिला प्रेमपत्रं पाठव

प्रेमात पडलं की असंच व्हायचं

माझं काय, तुमचं काय,  प्रेमात पडलं की असंच व्हायचं   तिचं बोलणं, तिचं हसणं  जवळपास नसूनही जवळ असणं;  जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं  अचानक स्वप्नात दिसणं !  खटयाळ पावसात चिंब न्हायचं  माझं काय, तुमचं काय  प्रेमात पडलं की असच व्हायचं   केसांची बट तिने हळूच मागं सारली ...  डावा हात होता की उजवा हात होता?  आपण सारखं आठवतो,  प्रत्येक क्षण,  मनात आपल्या साठवतो   ती रुमाल विसरुन गेली !  विसरुन गेली की ठेवून गेली?  आपण सारखं आठवतो,  प्रत्येक क्षण  मनात आपल्या साठवतो   आठवणींचं चांदण  असं झेलून घ्यायचं !  माझं काय, तुमचं काय,  प्रेमात पडलं की असंच व्हायचं   तिची वाट बघत आपण उभे असतो ...  ठरलेली वेळ कधीच टळलेली !  येरझारा घालणंसुद्धा  शक्य नसतं रस्त्यावर,  सगळ्यांची नजर असते  आपल्यावरच खिळलेली   माणसं येतात, माणसं जातात  आपल्याकडे संशयाने रोखून बघतात  उभे असतो आपण  आपले मोजीत श्वासः  एक तास ! चक्क अगदी एक तास !!   अशी आपली तपश्चर्या  आपलं त्राण तगवते  अखेर ती उगवते !   इतकी सहज! इतकी शांत !  चलबिचल मुळीच नाही,  ठरलेल्या वेळेआधीच  आली होती जशी काही !  मग तिचा मंजुळ प्रश्नः  "अय्या! तुम्ही आलात

सलाम

सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम, सलाम, भाई, सबको सलाम. वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम, शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळांतल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम, रिकाम्या हातातून उद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम, साहेबाची टरकावणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम, सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे, सभांचे फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची वेसण धरणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर माइक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम, गर्दी झुलवणाऱ्या जादूगारांना सलाम, भाईयों और बेहेनों स