अवतीभोवती कोणीच नसेल,
काळाकुट्ट काळोख असेल!
पायापुढची वाटसुद्धा दिसणार नाही,
'ओ'द्यायला कोणीसुद्धा असणार नाही!
प्रत्येक पाउल हरलेले,
जग उलट फिरले!
शरण न जाण्याची
हीच वेळ असते;
आपले आपण असण्याची
हीच वेळ असते!
अशा वेळी छातीवरती
ठेवा आपला हात,
''भिऊ नको!मी आहे!''
म्हणेल कोणी आत!
काळाकुट्ट काळोख असेल!
पायापुढची वाटसुद्धा दिसणार नाही,
'ओ'द्यायला कोणीसुद्धा असणार नाही!
प्रत्येक पाउल हरलेले,
जग उलट फिरले!
शरण न जाण्याची
हीच वेळ असते;
आपले आपण असण्याची
हीच वेळ असते!
अशा वेळी छातीवरती
ठेवा आपला हात,
''भिऊ नको!मी आहे!''
म्हणेल कोणी आत!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा