मैत्रीचे नाते होते
अपुले जेंव्हा
लागून ओढणी सहवासाची
तेंव्हा
मनी दाटून आल्या गोड
भावना नाना
अन एकांती मी ढाळीयले
अश्रुना .
मग जलस्नात त्या फुलांसारखे
झाले
मन माझे ताजे
प्रसन्नतेने भरले .
मी विवाहमाला तुझ्या घातली
कंठी
मजकडे पाहसी स्वर्ग आणुनी
नेत्री
त्या गभीरमंगल समयी डोळ्यांमधुनी
निखळली आसवे : भरली मांगल्यानी
घट सौख्याशेचा हृदयी आला
भरून :
जणू त्यातील आले उसळुनी
बिंदू दोन .
अन तेव्हापासून कितीकदा नयनात
साठली आसवे ,ओघळली जोमांत
.
जे आले अश्रू
उसळून आनंदाने
जाहली तयांची फुले तुझ्या
स्पर्शाने ;
त्या अश्रुफुलांचा गंध जई
दरवळला
संसार भासला मधुसुमनांचा झॆला
!
मन गेले केव्हा
दुः खाने व्याकळून
;
असहायपनाने भरुनी
आले नयन
तव नजर बोलतां
परी शांत गंभीर
हो इंद्रधनूपरी आर्त ,पालटे
नूर .
जी तुझ्याचसाठी आली अन
ओघळली ,
स्पर्शाने तुझिया फुलली,खुलली,हसली ,
ती आता आसवे
कुठे जाहली गुप्त
जी ढाळून व्हावे दुग्ध
चित्त हे शांत
!
: आसवे
: शेला
: इंदिरा संत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा