या व्याकुळ संध्यासमयीं
शब्दांचा जीव वितळतो.
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें
मी अपुले हात उजळतो.
तू आठवणींतुन माझ्या
कधिं रंगित वाट पसरशी,
अंधार-व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं.....
पदराला बांधुन स्वप्नें
तू एकट संध्यासमयीं,
तुकयाच्या हातांमधला
मी अभंग उचलुन
घेई.....
तू मला कुशीला
घ्यावें
अंधार हळू ढवळावा.....
संन्यस्त सुखाच्या काठीं
वळिवाचा पाऊस यावा
!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा