माणसाला , प्रत्येक माणसाला एक ठिकाण हवं असतं हरवून जाण्यासाठी . व्यवहारी जगातली सारी प्रतिष्ठेची उंची हे एक प्रकारचं ओझं असतं पाठीवरचं.ते ओझं फ़ेकुन खुप लहान व्हावं असं एक ठिकाण हवं असतं माणसाला .बक्षिसाची रंगीत जादू मिरवत आणण्यासाठी त्यात एक घर हवं असतं आणि त्या घरातही एक स्पर्श हवा असतो की,जो क्षणात माणसाचा भरजरी मोर करुन टाकतो. आपल्या पुढे काळ ही पिसं जपून ठेवतो.त्या पिसांमधले निळे-जांभले डोह आपल्याला व्याकूळ करत असतात . पुस्तकाच्या आवडत्या कवितेच्या कुशीत पहुडलेल्या या रेशीमखुणा आपण एकटे असताना बोलक्या होतात .एकेका शब्दागणिक आषाढाचा भरलेला मेघ घेउन येतात आणि रसरंगाच्या पावसात आपण चिंब होतो
:प्रविण दवणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा