विरहाची आर्तता जितकी आर्त तितक मन अन्न्याशारण होत , स्वतःच्याच पायाशी बसत : अगदी साधसुध होऊन जात. न कुणाशी लढ्न्याच बळ , न तक्रार करण्याच न जगण्याच ! विरह मनाला पार पार अगतिक करतो . एकच शोध...... एकंच ओढ........ जिवलग कुठाय ? पण तेच तर ठाऊक नाहीये न आता आठवनिसाठीही बळ नाहीये, इंदिराबैच्या ' भोवरा' मधून हेच अगतिक आर्तपण प्रतीत होत
कशी हाक घालू तरी
कुठे आहेस कळे ना ;
पडसाद उठे लाख
तुझी साद उमटेना
कशी तुला शोधू तरी
कुठे आहेस दिसेना
डोळ्यांतली काळी झेप
तुझ्यापर्यंत पोचेना
कसे तुला मी आठवू
आठवाया नाही बळ
मीच बुडाले माझ्यात
भोवरयाची ओढ खोल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा