पाऊस ! निसर्गाचा एक उत्कृष्ट विभ्रम.
ग्रीष्मानं व्याकुळलेल्या वसुंधरेचं आमंत्रण स्वीकारीत येणारे श्यामल मेघ काळजात घेऊन वावरण्याचं मन ज्याला आहे,
त्याला मला काय म्हणायचंय ते समजू शकेल. ज्याला कुणाच्या तरी प्रेमात पडता येतं, ज्याला समरसून झोकून देता येतं आणि ज्याला स्वत:च्या व्यक्तित्वाचा विसर पाडून सृष्टिच्या या भुलभुलय्यात हरवता येतं, तो तर पाऊस जगतो.
पाऊस जगता यायला हवा. पाऊस भोगता यायला हवा.
पाऊस झेलून ज्यांची फक्त शरीरं भिजतात ते कधी पावसात भिजतच नाहीत.
ज्यांना हे तुषार काळजापर्यंत जाणवतात, रक्तातले तरंग ज्यांच्या पापणीच्या काठाला येऊन
भिडतात, तेच खरं तर पाऊस अनुभवतात........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा