जन पळभर म्हणतिल ’हाय हाय’ ! मी जाता राहिल कार्य काय ? सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल, तारे अपुला क्रम आचरतिल, असेच वारे पुढे वाहतिल, होईल काहि का अंतराय ? मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, गर्वाने या नद्या वाहतिल, कुणा काळजी की न उमटतिल, पुन्हा तटावर हेच पाय ? सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा आपुल्या कामि लागतिल, उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल मी जाता त्यांचे काय जाय ? रामकृष्णही आले, गेले ! त्याविण जग का ओसचि पडले ? कुणी सदोदित सूतक धरिले ? मग काय अटकले मजशिवाय ? अशा जगास्तव काय कुढावे ! मोहि कुणाच्या का गुंतावे ? हरिदूता का विन्मुख व्हावे ? का जिरवु नये शांतीत काय ? : भा रा तांबे | ||
भंगु दे काठिन्य माझे आम्ल जाऊं दे मनींचे; येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य,आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ति-केंद्री त्वद्बियाणे. राहु दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा; अक्षरा आकार तूझ्या फुफ़्फ़ुसांचा वाहु दे गा. लोभ जीभेचा जळू दे दे थिजु विद्वेष सारा द्रौपदीचे सत्व माझ्या लाभु दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य ’मी’चे दे धरू सर्वांस पोटी; भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी. खांब दे ईर्ष्येस माझ्या बाळगू तूझ्या तपाचे; नेउं दे तीतून माते शब्द तूझा स्पंदनाचे त्वसृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू; थोर यत्ना शांति दे गा माझिया वृत्तीत बाणू. आण तूझ्या लालसेची; आण लोकांची अभागी; आणि माझ्या डोळियांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन् नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकुं दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे; घेऊ दे आघात तीते इंद्रियद्वारा जगाचे; पोळू दे आतून तीते गा अतींद्रियार्थांचे आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी; मागण्याला अंत नाही; आणि देणारा मुरारी. काय मागावे परी म्यां तूहि कैसे काय द्यावे; तूच देणारा जिथे अन् तूंच घे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा