जळात भिजले
वळण उन्हाचे ,
मावळतीच्या
सरणावरती
निजून आले
उरलेसुरले
दुःख मनाचे.
धुक्यात
गढल्या
भित्र्या
अगतिक कौलारांच्या तांबूस ओळी ,
मी फिरले
दारावर झोकून शिणली मोळी
झाले हलके
तमांत पैंजण.
तंग जरासा उसवून वारा ,
भावूक हळवी
धावत सुटले मृदबंधातून.
कवी - ग्रेस
कवितासंग्रह
- संध्याकाळच्या कविता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा